RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार!

पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी यांनी समाजपरिवर्तनासाठी RECONSCIO विचारसरणीचाच मार्ग अंतिम असल्याचे ठामपणे मांडले.
ते म्हणाले, गीता वाचूनही समाजात जात, अंधश्रद्धा आणि मानसिक गुलामी आजही टिकून आहे. याचे मूळ कारण म्हणजे मानवी मेंदूमध्ये साठलेली NGI (Non-Genetic Information) — म्हणजेच संस्कार, श्रद्धा, परंपरा आणि मानसिक पॅटर्न. “संविधान कागदावर आहे, पण माणूस चालतो तो मेंदूतल्या सॉफ्टवेअरवर,” मुळे असे ते म्हणाले.
गीतेचा खरा अर्थ — ‘मेंदू परिवर्तन ’Bhagavad Gita हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो “Neuro-Psychological Transformation Manual” असल्याचे गवळी यांनी सांगितले. त्यांच्या मते, गीता तामसिक, राजसिक आणि सात्त्विक अशा तीन मानसिक अवस्थांमधून माणसाला उच्च स्तरावर नेण्याचा मार्ग दाखवते.
तामसिक अवस्था — स्वार्थ, संकुचित विचार राजसिक अवस्था — क्रिया पण दिशाहीनता सात्त्विक अवस्था (RECONSCIO) — विवेक, संतुलन आणि जबाबदारी“ श्रवण पुरेसे नाही; गीता मेंदूत उतरवली पाहिजे,” असे ते स्पष्टपणे म्हणाले.
NGI सुधार शिक्षणाची गरज समाज बदलायचा असेल तर मेंदूचे ‘सॉफ्टवेअर’ बदलावे लागेल, असे सांगत त्यांनी इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंत RECONSCIO शिक्षण अनिवार्य करण्याची मागणी केली. या शिक्षणामध्ये Metacognition, NGI Correction, तसेच विवेक आणि जबाबदारी विकसित करण्यावर भर असेल, असे त्यांनी नमूद केले.
“खरी लढाई मेंदूतील” ही “आजची लढाई बाह्य नाही, ती मेंदूतील आहे,” असे सांगत त्यांनी तामसिक विचारांचा ‘तुरुंग’ तोडण्याचे आणि सात्त्विक RECONSCIO शासन प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.
“कायदे बदलले… आता मेंदू बदलण्याची वेळ आली आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी आपले विचार “डिच्चू फत्ते!” या घोषवाक्यासह मांडले.











