Homeताज्या बातम्याअहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी पहाट आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश

अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी पहाट आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश

वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीभवनात जाहीर केले. ही घोषणा शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, त्यांचे प्रयत्न आता यशस्वी ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी विधीभवनात भेट घेत असताना आमदार संग्राम जगताप यांनी महाविद्यालय शहरातच व्हावे यासाठी ठोस निवेदन सादर केले. जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरात वैद्यकीय शिक्षण व उपचार यांची नवी दारे उघडणार असून, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात कृषी विभागाची २५ एकर जागा उपलब्ध असून, ती सध्या वापरात नाही. ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सोलापूर, पुणे व मनमाडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांना सुलभ वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. ही बाब लक्षात घेता नालेगाव येथील कृषी विभागाच्या जागेतच महाविद्यालय सुरू करण्यासाठी योग्य ती प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!