Homeताज्या बातम्यासार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांचा गौरव झाल्याबद्दल सत्कार

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांचा गौरव झाल्याबद्दल सत्कार

100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कार्य पाठक यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यभर ठसा उमटविला -ए. एस. तारगे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव येथील उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल अहिल्यानगर विभागीय कार्यालयात प्रल्हाद पाठक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एस. तारगे, राहुरीचे उपअभियंता जावेद सय्यद, अभियंता सुधीर शिंदे, प्रथम लिपिक दिपक वाळके, प्रकाश थोरात, रियाज शेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपकार्यकारी अभियंता ए. एस. तारगे म्हणाले की, प्रल्हाद पाठक यांनी आपल्या कार्यशैलीमधून केवळ कार्यालयीन कार्यच नव्हे, तर नागरिकाभिमुख दृष्टिकोन जपत बांधकाम विभागाच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांनी केलेल्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कामाचे कौतुक करत तारगे यांनी पाठक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपअभियंता जावेद सय्यद यांनी प्रल्हाद पाठक यांचे काम हे केवळ निष्कलंकच नाही, तर नव्या पिढीच्या अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे असल्याचे स्पष्ट करुन त्यांचे अभिनंदन केले. प्रकाश थोरात यांनी अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे विभागाची विश्‍वासार्हता आणि जनतेशी जोडलेली नाळ मजबूत होते. त्यांचे कार्य सर्व विभागासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!