Homeमहाराष्ट्रनगर - पुणे महामार्गावरील 700 कोटींचा टोल घोटाळा आ. दातेंनी विधानसभेत गाजवला!

नगर – पुणे महामार्गावरील 700 कोटींचा टोल घोटाळा आ. दातेंनी विधानसभेत गाजवला!

बांधकाम उपविभाग अ.नगर ठरलंय भ्रष्टाचाराच केंद्र!

अहिल्यानगर प्रतिनिधी :- नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेस कंपनीकडून सुरू असलेली नियमबाह्य टोलवसुली आणि महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतचा मुद्दा आज विधानसभेत जोरदार गाजला. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी या घोटाळ्यावर थेट सरकारला जाब विचारला. फक्त 132 कोटींच्या प्रकल्पासाठी तब्बल 700 कोटी रुपयांचा टोल गोळा करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी ही बाब जनतेच्या सुरक्षेशी संबंधित लूट असल्याचा ठपका ठेवला. डांबरीकरणाच्या नावाखाली फक्त पॅचवर्क करण्यात आले असून, ॲम्ब्युलन्स, क्रेन आणि आपत्कालीन सेवेचा अभाव देखील गंभीर चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.

या घोटाळ्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने दाते यांनी थेट बांधकाम उपविभाग, अहिल्यानगरला या संपूर्ण भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू ठरवले आहे. दोषी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून ही आर्थिक लूट थांबवावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

नगर-पुणे महामार्गासह इतर अनेक देखभाल दुरुस्ती प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक घोटाळे घडल्याचे समोर येत असून, या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. शासकीय नियम आणि प्रक्रिया धाब्यावर बसवून कामे सुरू असून, यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!