बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला! तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक शब्दांत अभियंता कोमल थोरात यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. त्या म्हणाल्या बाबासाहेबांच्या जाण्याने एक युग संपले, परंतु त्यांनी दिलेला विचारांचा प्रकाश आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे.
कोमल थोरात पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण दिले. हजारो वर्षांच्या अन्याय, अस्पृश्यता आणि अंधकारातून समाजाला बाहेर काढून त्यांनी मानवी अधिकार, समानता आणि स्वाभिमानाचा श्वास दिला. महिला मग ती कोणत्याही समाजाची असो तीचे जीवन चातुर्वर्ण व्यवस्थेत नरक यातना भोगत असताना स्रि-दास्य, गुलामीतून मूक्ती बाबासाहेबांनी केली. आज महिला सन्मानाचे जीवन त्यांच्या मुळे जगत आहे.असे स्पष्ट करुन, ज्या समाजाचे अस्तित्वच नाकारले गेले होते, त्या समाजाला जगण्याचा हक्क, शिक्षणाची गुरु किल्ली आणि प्रगतीचा रस्ता बाबासाहेबांनी दिला. त्यांच्या संघर्षामुळे आज कोटी कुटुंबे उभी आहेत, स्वावलंबी आहेत, सन्मानाने जगत आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “बाबासाहेबांच्या विचारामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला. त्यांनी केवळ संविधान लिहिले आणि ‘मानवता’ ही जीवनाची खरी दिशा असल्याचे शिकवले. आजही त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेकजण स्वतःचा आणि समाजाचा परिवर्तनाचा प्रवास सुरू ठेवत आहेत. हा प्रकाश कधीही मावळणारा नाही—हा विचारांचा सूर्य युगानुयुगे मानवतेला उजळत ठेवणार आहे.” अशा भावना अभिवादन करतांना व्यक्त केल्या.

