Homeताज्या बातम्याअहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी पहाट आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश

अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी पहाट आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश

वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीभवनात जाहीर केले. ही घोषणा शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, त्यांचे प्रयत्न आता यशस्वी ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी विधीभवनात भेट घेत असताना आमदार संग्राम जगताप यांनी महाविद्यालय शहरातच व्हावे यासाठी ठोस निवेदन सादर केले. जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरात वैद्यकीय शिक्षण व उपचार यांची नवी दारे उघडणार असून, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात कृषी विभागाची २५ एकर जागा उपलब्ध असून, ती सध्या वापरात नाही. ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सोलापूर, पुणे व मनमाडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांना सुलभ वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. ही बाब लक्षात घेता नालेगाव येथील कृषी विभागाच्या जागेतच महाविद्यालय सुरू करण्यासाठी योग्य ती प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!