Homeताज्या बातम्याशनी शिंगणापूर ट्रस्ट बरखास्त! ५०० कोटींचा भ्रष्टाचार 

शनी शिंगणापूर ट्रस्ट बरखास्त! ५०० कोटींचा भ्रष्टाचार 

  नियंत्रण ठेवून मंदिराच्या पैशातून सरकारने         विकास कामे करावीत जनतेची मागणी 

अहिल्यानगर सोनई: – शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्ट थेट बरखास्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या या देवस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अनियमितता, अपारदर्शक कारभार आणि बिनधास्त लूट सुरू होती, अशी तिखट टिप्पणी सरकारच्या सूत्रांनी केली आहे.

 

भक्तांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांचा विनियोग न करता त्याचा अपहार करणाऱ्या ट्रस्टींनी आपली खुर्ची आणि नातेसंबंधांचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. ट्रस्टच्या निधीतून खासगी ठेकेदारांना कामे मिळवून देणे, नियमबाह्य खर्च करणे, आणि लेखापालांशी संगनमत करत देणग्यांचा गैरवापर करण्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेपही झाल्याची चर्चा आहे. भक्तांनी मंदिराला दान केलेल्या रकमेतून राजकीय मंडळी भ्रष्टाचार करून आपली स्वतःची सत्ता राखण्यासाठी व संपत्ती जमा करण्यासाठी या पैशाचा वापर करीत असतील तर ही दुर्दैवी असून, भक्तांच्या भावनेला दुखावणारी बाब आहे. याकरिता सरकारने मंदिर पैशातून जनतेच्या विकासाची कामे करावीत अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

 

राज्य सरकारने आता याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. देवस्थानावर श्रद्धा ठेवणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “भक्तांची लूट थांबवण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!