Homeताज्या बातम्याउपजिल्हाधिकारी खिरोळकर पाच लाखाची लाच घेताना रंगेहात

उपजिल्हाधिकारी खिरोळकर पाच लाखाची लाच घेताना रंगेहात

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. यानंतर एसीबीने उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले आहे. लाचखोर विनोद खिरोळकरच्या घरातून 59 तोळे सोने आणि 13 लाखांच्या रोकडसह सुमारे 67 लाखांचा ऐवज जप्त एसीबीने जप्त केला आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या कामासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करायची होती. ती करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे 41 लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील 23 लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. मात्र, तरीही 18 लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आज एसीबीने त्यांना रंगेहात अटक केली. अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन मार्फत ही लाच घेण्यात येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच एसीबीने लाचखोर खिरोळकरच्या घरी धाड टाकून मोठा ऐवज आणि रोकड जप्त केली आहे.चलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद खिरोळकर यांच्या घरातून तब्बल 13 लाख 06 हजार 380 रुपयांची रोकड, 50 लाख 99 हजार 583 रुपयांचे 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोन्याचे दागिने, तसेच, 3 लाख 39 हजार 345 रुपय किमतीचे 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, यांसह इतर काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

एसीबीला काय सापडले?

रोख रक्कम : 13 लाख 6 हजार 380,सोने (589 ग्रॅम / 59 तोळे) : 50 लाख 99 हजार 583,चांदीचे दागिने (3.5 किलो) : 3 लाख 39 हजार 345,

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांवर एसीबीने कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात महिलाही आघाडीवर आहेत काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यात देखील महिला क्रीडा अधिकारीलाही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.

आता छत्रपती संभाजीनगर मध्ये निवासी उप जिल्हा अधी काऱ्याला करण्यात आली आहे. अव्वल कारकून दिलीप त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.

LockIcon

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!