धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी – न्यायमूर्ती अभय ओक
नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कारण हा मुद्दा केवळ झाडतोडीचा नाही—तो धर्माच्या नावावर निसर्गाचा बळी देण्याचा आहे.
अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी एक ऐतिहासिक विधान करून या संघर्षाला घटनात्मक बळ दिले आहे. ते म्हणाले की —“धार्मिक उत्सवाच्या नावाने जर निसर्गाची हानी केली, तर तो धर्म संविधानाने संरक्षित राहणार नाही.”हे वाक्य दंडकारण्य सत्याग्रहासाठी निर्णायक ठरले आहे, कारण त्याने निसर्ग संरक्षणाला थेट भारतीय संविधानाची साथ मिळाली आहे.न्यायमूर्ती ओक यांनी काय स्पष्ट केले? भारतीय संविधानातील कलम 25 नागरिकांना धर्मस्वातंत्र्य देते. पण हे स्वातंत्र्य पूर्ण नाही; ते सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या तीन अटींनी मर्यादित आहे.झाडतोड केल्याने पर्यावरण बिघडते.हवा, पाणी, तापमान आणि जमिनीचा समतोल ढासळतो दुष्काळ, उकाडा आणि आजार वाढतात.म्हणजेच लोकांचे आरोग्य व सुव्यवस्था धोक्यात येतात,त्यामुळे धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.दंडकारण्य का महत्त्वाचे? नाशिकचे हरित फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे दंडकारण्य हे:हजारो वन्य प्राणी-पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे.पाऊस जमिनीत साठवून ठेवणारे नैसर्गिक स्पंज आहे.मध्य महाराष्ट्रा च्या हवामानाला थंड ठेवणारे हरित रक्षण कवच येथील झाडे नसतील तर—भूजल पातळी खाली जाईल,प्रचंड उकाडा वाढेल,दुष्काळ आणि पाणीटंचाई तीव्र होईल.जैवविविधता उद्ध्वस्त होईल,कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना असे अमूल्य जंगल नष्ट करण्याची गरज काय?
धर्म आणि निसर्ग : एकमेकांचे पूरकआहेत.भारतीय परंपरेत वृक्षपूजन, नदीपूजन, वनपूजन यांना अत्यंत महत्व आहे. रामायण, महाभारत, जैन- बौद्ध परंपरेत निसर्गाला देवतासमान मानले आहे.
म्हणूनच न्यायमूर्ती ओक यांचे म्हणणे आज अत्यंत प्रासंगिक आहे—
धर्म निसर्गापासून वेगळा नाही; निसर्गविनाश म्हणजे अधर्म!
दंडकारण्य सत्याग्रह म्हणजे काय? तर हा कुठल्याही पक्षाचा किंवा पंथाचा लढा नाही. हा आहे— निसर्ग, पाणी, हवा आणि भविष्य वाचवण्याचा जनसत्याग्रह.जनतेचा मूलभूत हक्क असा आहे “स्वच्छ हवा, पाणी आणि सुरक्षित पर्यावरण हा जन्मसिद्ध अधिकार.” न्यायमूर्ती ओक यांच्या विधानामुळे या सत्याग्रहाला आता नैतिक आणि घटनात्मक सामर्थ्य मिळाले आहे. शेवटचे सत्य देवालयांपूर्वी पृथ्वी आहे.मंदिरांपूर्वी झाडे आहेत,धर्मापूर्वी निसर्ग आहे.कुंभमेळा मोठा नक्कीच आहे, पण निसर्गापेक्षा मोठे कोणतेही देवालय नाही!दंडकारण्य सत्याग्रह हा फक्त जंगलासाठी नाही—तो भविष्याच्या पिढ्यांना वाचवण्याचा लढा आहे.

