Homeताज्या बातम्याग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी


अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.

 

ॲड.गवळी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात पावसाचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेले नाही; परंतु पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन आणि साठवण होत नसल्यामुळे पाणीटंचाई व उष्णतेची समस्या वाढत आहे. “पाऊस निसर्ग देतो; परंतु त्या पावसाचे मातीतील ओलाव्यात रूपांतर करणे ही मानवाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

त्यांनी “मॉइश्चर नॅनो ओशन” ही संकल्पना मांडताना सांगितले की, पावसाचे पाणी जमिनीत मुरवून ते मातीतील सूक्ष्म छिद्रांमध्ये साठवले, तर दीर्घकाळ टिकणारा भूमिगत ओलावा तयार होतो. हा ओलावा झाडांच्या मुळांना सतत पाणी पुरवतो, जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतो आणि पर्यावरणीय संतुलनास हातभार लावतो.

 

यासाठी “रेन गेन बॅटरी” ही साधी आणि किफायतशीर यंत्रणा प्रभावी ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्तरावर दगड, खडी, वाळू आणि मुरूम यांच्या साहाय्याने तयार केलेल्या या व्यवस्थेमुळे पाणी खोलवर मुरते, भूजल पातळी वाढते आणि मातीतील ओलावा टिकून राहतो. प्रत्येक घर, शेत आणि मोकळ्या जागेत अशी यंत्रणा उभारली गेली, तर स्थानिक पातळीवर मोठा बदल घडू शकतो, असे ते म्हणाले.

 

गवळी यांनी पुढे “रेन गेन फॉरेस्ट”ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, मातीतील सातत्यपूर्ण ओलाव्यामुळे नैसर्गिकरीत्या झाडांची वाढ वेगाने होते. परिणामी कार्बन डायऑक्साइडचे शोषण वाढते, तापमान कमी राहते आणि जैवविविधता वृद्धिंगत होते.

 

“ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धची लढाई मोठ्या घोषणांपेक्षा स्थानिक पातळीवरील कृतीतून जिंकली जाईल. प्रत्येक नागरिकाने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन अड. कारभारी गवळी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!