Homeताज्या बातम्याअण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात; महाराष्ट्र शासनातर्फे ऐतिहासिक पाऊल -डॉ. मिलिंद...

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात; महाराष्ट्र शासनातर्फे ऐतिहासिक पाऊल -डॉ. मिलिंद कसबे                     

 

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ | महाराष्ट्र राज्य समाचार :-     थोर साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अण्णाभाऊंचे विचार आणि शब्द अधिक व्यापक प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.         या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देताना डॉ. मिलिंद कसबे यांनी सांगितले की, “साहित्यिक समितीचे सचिव प्राचार्य डॉ. संजय शिंदे आणि समितीतील सर्व सदस्य यांच्या विशेष पुढाकाराने ही डिजिटल जबाबदारी पेलणं शक्य झालं.” या उपक्रमाअंतर्गत अण्णाभाऊ साठे यांची साहित्यखडे, कथा, ललित लेखन आणि लोकवाङ्मयाचे विविध पैलू ऑडिओ स्वरूपात डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे साहित्य केवळ वाचनापुरते मर्यादित राहणार नसून, ऐकण्यायोग्य माध्यमातून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा दुर्दम्य प्रयत्न होणार आहे.

शासनाच्या वतीने राबवत असलेल्या या उपक्रमामध्ये समितीच्या सर्व सदस्यांचा विशेष सहभाग आहे या मध्ये प्राचार्य डॉ. संजय शिंदे,डॉ. बळीराम गायकवाड,डॉ. सोमनाथ कदम,डॉ. शरद गायकवाड,प्राचार्य माधव गादेकर,डॉ. दिलीप चव्हाण,शिवा कांबळे,डॉ. प्रमोद गारोडे,डॉ. अंभोरे,डॉ. सचिन साठे,डॉ. विजय कुमठेकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मोलाची भूमिका बजावली असे डॉ. कसबे यांनी ऋण व्यक्त केले.

डॉ. कसबे म्हणाले,आज वारसा जपण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळत असून “या प्रकल्पामागे केवळ साहित्य जतन करणे हा हेतू नसून, अण्णाभाऊंचे विचार जनमानसात पोहोचावेत, त्यांच्या संघर्षमय वाटचालीची जाणीव पुढील पिढ्यांनाही व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...
error: Content is protected !!