Homeताज्या बातम्या"देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी मध्ये ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीणे चुरस!...

“देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी मध्ये ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीणे चुरस! “!

वंचित बहुजन आघाडी कडून नगराध्यक्ष पदासाठी नामांकित विधिज्ञ अ‍ॅड. प्रसाद सांगळे यांची उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर ( देवळाली प्रवरा )नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीला देवळाली करांचा दणदणीत प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारी मुळे राजकारणातील समीकरण बदलले आहे.

देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले उमेदवार ॲडव्होकेट प्रसाद सांगळे हे केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नसून, समाजाच्या न्यायासाठी लढणारे संवेदनशील, अभ्यासू आणि नितीमूल्य जपणारे प्रतिष्ठित विधिज्ञ म्हणून परिचित आहेत.

कायद्याचे सखोल ज्ञान, तडफदार युक्तिवाद, आणि न्यायासाठीची अबाधित निष्ठा यामुळे सांगळे यांनी अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवून दिले आहेत. दुर्बल, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी न्याय मिळवून देताना त्यांनी स्वतःचे आर्थिक व व्यक्तिगत हित कधीच पुढे ठेवले नाही. निस्वार्थी सेवा, प्रामाणिक वकिली आणि मानवतावादी दृष्टिकोन ही त्यांची खरी ओळख आहे.

सांगळे हे देवळाली प्रवराचे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र, कायदेतज्ज्ञ आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्य नागरिकांत त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असून, सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थी काम यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य समाचार शी बोलतांना ॲडव्होकेट प्रसाद सांगळेम्हणाले कि, देवळाली प्रवरा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास हा आपले प्रथम ध्येय आहे, असे सांगळे यांनी उमेदवारीनंतर व्यक्त केले. शैक्षणिक, कायदेशीर आणि प्रशासनिक ज्ञानाच्या जोरावर “देवळाली प्रवरा बदलून दाखवू” असा त्यांचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक कार्यातही सांगळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, युवकांमध्ये शिक्षणाची जाणीव, नागरिकांमध्ये कायदेशीर साक्षरता व हक्कांसाठीची जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेतील अनेक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मते देऊन विकासाचा योग्य मार्ग दाखवला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी अशी स्वच्छ प्रतिमा असलेला, कायदेशीर जाण असलेला आणि लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणारा उमेदवार मिळणे ही देवळाली प्रवरासाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे.

स्थानिकांमध्ये सांगळे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “विकास, पारदर्शकता आणि न्याय” या ध्येयांसह ते शहराला नवी उभारी देण्यास सक्षम नेतृत्व आहेत, अशी लोकांमध्ये अशा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...
error: Content is protected !!